Sunday 25 February 2018

प्रा. बबनराव तायवाडे सेवानिवृत्त

नागपूर,दि.25- धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य आणि यंग टीचर्स संयोजक प्रा. बबनराव तायवाडे हे आज प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी त्यांच्या सेवानिवृत्तीसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
धनवटे नॅशनल कॉलेजच्या पटांगणात आयोजित या सोहळ्याला शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी अध्यक्ष वसंतराव धोत्रे, अनंतराव घरड, गिरीश गांधी, बाळ कुलकर्णी, रणजित मेश्राम, डाॅ़ धनराज माने, आमदार शशीकांत खेडकर, शैलेष पांडे, महापौर नंदाताई जिचकार, प्राचार्य बलविंदर, गजानन जानभोर, प्राचार्य बबनराव तायवाडे, प्राचार्य शरयू तायवाडे, अतुल लोंढे, संस्था उपाध्यक्ष नरेश ठाकरे, दिलीप इंगोले फुंडकर, प्रमोद मानमोडे , प्रा.एन.एच खत्री संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य बबनराव तायवाडे यांचा सपत्निक सत्कार संस्थेचे अध्यक्ष वंसतराव धोत्रे, हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
आपल्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त बोलताना प्राचार्य डाॅ.बबनराव तायवाडे म्हणाले की, १९७६ साली याच महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून आलो. पण जिथे विद्यार्थी म्हणून घडलो,त्याच महाविद्यालयाचा प्राचार्य होणार याची कल्पना सुद्धा केली नव्हती. या महाविद्यालयातील शिक्षक हेच आमचे मार्गदर्शक होते. बायोफोकलचा इन्स्ट्रक्टर म्हणून नोकरीला सुरवात केली. काम करायची संधी मिळाली. जोपर्यंत शिक्षक होतो, तेव्हापर्यंत कधीच पुस्तक हातात घेऊन वर्गात गेलो नाही. १० वर्षे ८ महिन्यांच्या नोकरीनंतर प्राचार्य म्हणून रूजू झालो.  त्यावेळी जो विश्वास संस्थेचे अध्यक्ष धोत्रे साहेबांनी दाखविला, तो टिकविण्यात मी यशस्वी राहिलो याचे पूर्ण समाधान आहे. संबंधामुळेच महाविद्यालयाच्या विकासाला प्रेरणा मिळाली. संस्थेने माझे सर्वच प्रस्ताव स्वीकारले. ते ऋण मी कधीही विसरणार नाही. आपल्या १९ वर्षाच्या  कार्यकाळात महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोचविल्याचा अभिमान आहे. आमची मैत्री आजही कायम टिकून आहे. यंग टिचर्स मुळे १० हजार लोकांच्या घरात आज चुली पेटल्या आहेत. महाविद्यालयाला सारून दुसऱ्या कामांना कधीच प्राधान्य दिले नाही. ओबीसींसाठी काहीतरी काम करुन समाजाला सरकारकडून काही मिळवून देता येईल, हेच प्रयत्न करीत आहोत. चांगल्या मनाने काम करा, लोक नक्कीच सहकार्य करतात, हे ओबीसी कार्यक्रमातून समोर आले आहे. मला ५१ लाख रुपयाचा धनादेश समाजकार्यासाठी दिला त्या राशीचा उपयोग समाजकार्यासाठीच होणार याची ग्वाही देत कृतज्ञता व्यक्त करतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख म्हणाले की, समाजकार्यासाठी ३ वर्षाची मुदतवाढ मिळत असताना सुद्धा त्यांनी ती टाळून समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. संस्थेच्या कार्यकारिणीचा सदस्य असताना मला कधीच वाटले नाही. वैयक्तिक कार्यातही नेहमीच राहिली. पण मला अध्यक्ष म्हणून काम करून घेण्याची  संधी मिळालीच नाही, असे विचार व्यक्त केले. माजी सहकारमंत्री वसंतराव धोत्रे यांनीही तायवाडे यांच्या कार्याची स्तुती केली. विनोदी शैलीत सर्वांना खूश केले. तायवाडे या संस्थेचे संचालक म्हणून येथे काम करतील. त्यांचा स्वतंत्र कक्षही राहील, अशी घोषणा संस्थेच्या संचालकांच्या वतीने केली. त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे
 अनंतराव घरड म्हणाले की, येथून राजकारण, समाजकारणाला बबनरावांनी सुरवात केली. हा निरोप समारंभ नव्हे तर सत्कार सोहळा त्यांचा आहे. कांग्रेसचे राजकारण कधीच होऊ दिले नाही.
जेष्ट पत्रकार रणजित मेश्राम म्हणाले, मित्रत्वाचे सौख्य जपणारे व्यक्तिमत्व त्यांनी कधीच स्वतःपुरता विचार केला नाही.  त्यांनी नेहमीच गृपच्या माध्यमातून समाजासाठीच नव्हे विद्यापिठाच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे बहुजन समाजाच्या विद्यार्थांना घडविण्याचे काम केले. तुम्ही ओबीसीचे काम हाती घेतले आहे आता निवृत्तीनंतर तुम्हाला ओबीसीची मशाल कानाकोपऱ्यात पोचवून जनजागृतीचे कार्य करण्याची जबाबदारी वाढली आहे. प्राध्यापकांच्या समस्येसाठी यंग टिचर्स असो.ची स्थापना केली. आजही चालवित आहेत. पण आज त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा होत आहे. परंतु, त्यांच्या संघटनेचे नाव मात्र यंग टिचर्सच हे कसं?                                                
बाळ कुलकर्णी म्हणाले, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच सामाजिक कार्यासाठी आपल्या कार्यकाळात उपलब्ध करुन एका शिक्षण संस्थेचा परीसर जनतेत सामाजिक चळवळीचे केंद्र म्हणून उपलब्ध करून देण्याचे धाडस अभिनंदनीय आहे. पेट्रोलपंपावर काम करीत असताना शिक्षण घेत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीत मित्रांच्या प्रत्येक सुख दुखात नेहमी सोबत राहणारे व्यक्तिमत्व बबनराव आहे.
गिरीश गांधी म्हणाले की, बबनराव म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व. खस्ता घालून आपले जिवन घडवले. स्वतःसाठी कधी जगले नाही. विद्यार्थी जिवनापासून जी धडपड होती, तोच संघर्ष समाजासाठी त्यांनी केला. त्यांच्या हातून ३५ विद्यार्थी हे आचार्य घडले, हे त्यांचे कार्यकौशल्य आहे. देशपातळीवर ते ओबीसी संघटनेच्या माध्यमातून पोचले आहेत. आपले कर्तृत्व राजकारणात वैरत्व बदलण्याची शक्यता असल्याने सांभाळून राहण्याची गरज आहे. सामाजिक क्षेत्रात काम करताना प्रतिस्पर्धी तसे कमीच असतात.आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत. महाविद्यालयाला जे नाव मिळाले ते वेगळे आहे. गौरीशंकर पाराशार यांनी सांगितले की,विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यात नेहमी सहकार्य केले. गुटखा खाने के बाद वो एडवांटेज है क्यु की बोलना ही नही पडता. बबनराव गृपला घेऊन काम करणारे असल्याने त्यांना काही अडचन नाही. तायवांडेचा पर्याय शिक्षण संस्थेला सध्या नाही. त्यामुळे त्यांचे या प्रांगणात अस्तित्व कायम राहणे गरजेचे आहे. त्यांच्या कार्याचा वापर संस्थेने करावा, अशी संस्थेला विनंती आहे. आपल्या सेवानिवृत्तीला दोन्ही अध्यक्ष उपस्थित आहेत, हीच कार्याची पावती होय.
प्राचार्य व सेवानिृत्ती सत्कार समितीच्या वतीने जाहिर सत्कार करण्यात आले. यावेळी ५१ लाखाचा धनादेश प्राचार्य बबनराव तायवाडे यांना देण्यात आला. संचालन प्रा.कोमल ठाकरे यांनी केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...