Wednesday 14 February 2018

साहित्य संमेलन की राजकीय मेळावा ?



साहित्य संमेलनातून मूळ गाभाच गायब,कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन व कथाकथन गेले कुठे

३५ लाखाचे मंडप होणार,नागपूरच्या खासगी व्यक्तीला कंत्राट

समेलनांध्यक्षाचे फोटोही पत्रके व पत्रिकेतून गायब

गोंदिया (खेमेंद्र कटरे),दि.१४: साहित्याचा जन्मच कवितेतून झाला आहे. तसेच संत हे प्रामुख्याने काव्य निर्मितीमधूनच उदयास आले. पण अ.भा. मराठी वारकरी संत साहित्य संमेलनात कवीसंमेलन, प्रकाशन, कथाकथनकच नाही. म्हणून आजूबाजुचे साहित्यिक व कवींचा नाराजीचा सूर दिसत असून साहित्य संमेलन की,राजकीय मेळावा? अशा चर्चा आता अवघ्या महाराष्ट्रात रंगू लागल्या आहेत.विशेष म्हणजे ज्या अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीच्या क्षेत्रात हा कार्यक्रम होत आहे,त्या नगराच्या प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षांचे नाव आणि ज्या जिल्हा परिषद शाळेच्या पटागंणावर हा कार्यक्रम होत आहे,त्या शाळेच्या शिक्षण समिती अध्यक्ष असलेल्या जिल्हा परिषद सदस्याला सुध्दा साहित्य समेंलनाच्या पत्रिकेत नाव घालतांना डावलण्यात आल्याने या समेलंनाला एकप्रकारे एका विशिष्ट पक्षाचा रंग देण्याचाच प्रयत्न झालेला आहे.
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव ह्या तालुक्याच्या ठिकाणी होत असलेल्या वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या विद्यमाने हे संमेलन होत आहे. या संमेलनात हभप महाराजांची चांगली परवणी आहे. तसेच नामवंत साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक यांची पत्रिकेवरून नावच गायब करण्यात आले आहेत. मात्र, राजकीय नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ज्या साहित्यापासून साहित्याची निर्मिती झाली त्याच साहित्यात वावरणारे लोकांची संख्या कमी आहे. कवितेमुळेच साहित्याची निर्मिती झाली. पण या संमेलनात कवींचा साधा उल्लेखसुद्धा या साहित्य संमेलनात करण्यात आला नाही. मुख्य म्हणजे ज्यांची झाडीपट्टीची बहिणाबाई म्हणून ओळख आहे. अशा अंजनाबाई खुणे व संत साहित्यिक डोमाजी कापगते यांचा नाव जाणिवपुर्वक टाळण्यात आले आहे. तर या भागाचे प्रतिनिधीत्व करणारे माजी आमदार/खासदार नाना पटोले यांचे नाव वगळून एक राजकीय द्वेष जगजाहिर करण्यात आले यापेक्षा वाईट काय असू शकते. संमेलनात संत आणि स्वत:ला संत समजणारे लोक जास्त दिसत आहेत. भजनी हे संत होवू शकत नाही. संमेलनाच्या आयोजकांना बहुजन चळवळीतील संताचा प्रामुख्याने विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. साहित्याची खरी भूमिका मांडणारे म्हणजे संत तुकाराम, संत जनाबाई, बहिणाबाई, संत चोखामेळा, गाडगेबाबा महाराज, संत एकनाथ, ज्ञानेश्वर, संत नरहरी सोनार अशा संतांनी समाज जागृतीचे काम केले. संतांनी कविता, भजन किर्तन, पोवाळा, भारुड, डहाका, लावणी, गण, गौळण, अभंग या लोककलेचा प्रकार काव्य निर्मितीकरांनी केला. पण संतांचा या ठिकाणी प्रामुख्याने नामोल्लेख झाल्याचे दिसत नाही. कुठल्याही साहित्य संमेलनात राजकारणी लोकांचे काय काम असावे? असा सवालही सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत. सत्ताधारी हे देशाचा, राज्याचा, समाजाचा, गावाचा विकास न करता आता साहित्याच्या मंचावर आपला तोरा दाखविणार आहेत. या साहित्याच्या मंचावर केंद्रापासून मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सहकारी सदस्य, बाजार समिती सदस्य यांना कोणत्या साहित्य प्रकारचा किंवा समाजसुधारकांचा, महापुरुषांचा, संतांचा अभ्यास असतो हे कळतच नाही. तेव्हा हे संत साहित्य संमेलन आहे की, राजकीय मेळावा? अशा चर्चांना साहित्य वर्तुळात रंगत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...