Mumbai 14: गारपीटग्रस्तांसाठी सरकारने नुकतीच तातडीची मदत जाहीर केली असून, कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी 6 हजार रुपये तर जिरायतीसाठी प्रति हेक्टरी 13,500 रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
तर मोसंबी आणि संत्र्या उत्पादकांना हेक्टरी 23 हजार 300, केळी उत्पादकांना हेक्टरी 40 हजार, आंब्याला हेक्टरी 36 हजार 700 रुपये भरपाई मिळणार आहे. विमा नसललेल्या फळबाग शेतकऱ्यांनाही या अनुदानाचा लाभ मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले असून, पीकविमा, आणि एनडीआरएफच्या नियमानुसार ही शासकीय मदत दिली जाणार आहे.
No comments:
Post a Comment