Saturday 20 April 2019

राज्यातील २७ पॉलिटेक्निक कॉलेज बंद?

मुंबई/वृत्तसंस्था,दि.20ः–इंजिनीअरिंगप्रमाणे पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या जागाही मोठय़ा प्रमाणात रिक्त राहण्यास सुरुवात झाली आहे. २0१८ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात पॉलिटेक्निकच्या सुमारे ७१ हजार ९00 जागा रिक्त राहिल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर, २७ कॉलेजांनी आपले कॉलेज बंद करण्याचा प्रस्ताव सादर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल पाच हजार जागा कमी होणार आहेत.
दहावीनंतर पॉलिटेक्निक पदविका घेऊन विद्यार्थी बाहेर पडत होते. मात्र, आता या अभ्यासक्रमांना दहावीचा निकाल उत्कृष्ट लागत असताना उतरती कळा लागली आहे. गेल्यावर्षी तब्बल ७२ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यापूर्वी, म्हणजे २0१७मध्ये पॉलिटेक्निकच्या तब्बल ८0 हजार ८३५ जागा (५६.६४ टक्के) रिक्त राहिल्या होत्या. यानंतर २0१८ची प्रवेश प्रक्रिया करताना जागा रिक्त राहणार्‍या संस्थांमधील १९ हजार जागा कमी करण्यात आल्या होत्या. यानंतरही पॉलिटेक्निकला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. यामुळे टक्केवारीनुसार २0१८मध्ये जास्त जागा रिक्त आहेत. २0१८मध्ये राज्यभरातील १ लाख २३ हजार ५0९ जागांपैकी केवळ ५१ हजार ६९0 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. शासकीय तसेच, अनुदानित कॉलेजांमधील सुमारे पाच हजारांहून अधिक जागा ओस पडल्या होत्या. विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार फी भरावी लागत असूनही या जागा भरलेल्या नाहीत. शासकीय कॉलेजांतील ४ हजार ७७२, तर शासकीय अनुदानित कॉलेजांतील ४१0 जागा रिक्त राहिल्या होत्या.सरकारी कॉलेजांतील जागा रिक्त राहू लागल्यानंतर खासजी कॉलेजांनीही नांगी टाकण्यास सुरुवात केली आहे. अनेक संस्थाचालकांनी कॉलेज चालविणे परवडत नसल्याचे कारण पुढे करत कॉलेज बंद करण्याचे प्रस्ताव तंत्रशिक्षण संचालनालयाकडे सादर केले आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...