मुंबई - आगामी चार वर्षांमध्ये देशातील विमा उद्योगामध्ये भरभराट येण्याची चिन्हे दिसत असून 2020 पर्यंत विमा क्षेत्रातील हप्त्याचे संकलन 26 लाख कोटी रुपयांपर्यंत पोचण्याचा अंदाज एका अहवालातून समोर आला आहे. कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) ही स्वयंसेवी संस्था आणि केपीएमजी या कर आणि करासंदर्भातील सल्ला देणाऱ्या कंपनीने केलेल्या संयुक्त अभ्यासातून विमा क्षेत्रात भरभराट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सीआयआय आणि केपीएमजीच्या "डिस्ट्रीब्यूशन डिसरप्टेड' अहवालात भारतातील विमा, म्युच्युअल फंड आणि इतर आर्थिक वितरण माध्यमांच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे. देशात डिजिटल माध्यमांद्वारे विमा वितरणास आणखी पुष्कळ संधी असून, आणखी मध्यस्थांनी (इंटरमिडिएरीज्) या क्षेत्रात प्रवेश करण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष व्यक्त केला आहे. त्यासाठी विमा कंपन्यांनी ग्राहकांपर्यंत पोचण्याच्या धोरणात पुन्हा बदल करावे व लोकांमध्ये या माध्यमाविषयी जागरुकता वाढविण्यास प्रयत्न करावे असा सल्ला देण्यात आला आहे. म्युच्युअल फंड उद्योगासंदर्भातील या अहवालात म्हटले आहे की, या क्षेत्रातील मालमत्तेत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. येत्या पाच वर्षांमध्ये हा कल कायम राहण्याची शक्यता आहे. परंतु, इतर देशांच्या तुलनेत म्युच्युअल फंड व्यवसायाचा प्रसार अत्यंत कमी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया। संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश में सबसे ज्यादा गंभीर स्थिति और कोरोना का हमला पुरा महाराष्ट्र प्रदेश झेल रहा है, एैसी स्थिति में राज्...
-
नवेगावबांध,दि.21: व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक तरुण वाईट मार्गाला लागत आहे. गावातील अवैध ध...
No comments:
Post a Comment