Wednesday 30 November 2016

मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास चक्का जाम

अकाेला - नागपूर अधिवेशनापूर्वी मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास चक्का जाम
आंदाेलन छेडण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजातर्फे सरकारला देण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत साेमवारी (ता.२८) सकल मराठा समाजातर्फे निवेदन देण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या अमरावतीत १९ नाेव्हेंबर राेजी संपन्न झालेल्या राज्यव्यापी बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार आज सकल मराठा समाज अकोलाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला २६ पानांचे निवेदन सादर करण्यात आले. उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी निवेदन स्विकारले. मराठा समाजाने कोणत्याही नेतृत्वाशिवाय अत्यंत संयम राखुन शिस्तबध्द पध्दतीने मराठा क्रांती मुक मोर्चाव्दारे आपल्या तीव्र भावना व संताप व्यक्त केला आहे. शासनाने वेगवेगळ्या समित्या नेमून शासनाने धुळफेक करू नये. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आता जागा झाला आहे.
काेपर्डी येथील निर्घुण खून व अत्याचारा करणाऱ्या तीनही आरोपींच्या विरोधात शिघ्रगतीने खटल्याचा निर्णय घेणे, अॅट्रासिटीज अॅक्टच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर व त्यामुळे मराठा व इतर समाजावर होत असलेल्या अन्याय म्हणुन या कायदयात दुरूस्ती, मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मराठा समाजासाठी सिमित करणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्ती व शेतीमालास हमीभाव मिळणे, छत्रपती शिवरायांचे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारणे इत्यादी मागण्यांसह २० मागण्यांच्या सादर केलेल्या निवेदनावर सरकारने कार्यवाही केली नाही तर येत्या विधिमंडळ अधिवेशनात नागपूर व मुंबई येथे देखील सकल मराठा समाज लाखोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चानंतरही न्याय न मिळाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी सकल मराठा समाजातील अनेक महिला व पुरूष उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...