नवी दिल्ली- नोटबंदीमुळे जनसामान्यांना सोसावे लागणारे हाल देशासमोर अधोरेखित करण्यासाठी तृणमूल वगळता तमाम विरोधी पक्षांनी सोमवारचा दिवस आक्रोश दिवस म्हणून पाळण्याचे ठरवले आहे.
सरकारच्या निर्णयामुळे बाजारपेठेला व अर्थव्यवस्थेला मंदीची अवकळा प्राप्त झाल्यामुळे कोणतेही व्यवहार बंद न पाडता बहुतांश विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’च्या आवाहनात सहभागी न होण्याचे ठरवले आहे. एकट्या तृणमूल काँग्रेसने बंदची हाक दिली असून, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: रस्त्यावर उतरणार आहेत. जनता दलने (संयुक्त) मात्र भारत बंदमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने ब्लॉक, जिल्हा व प्रदेश स्तरावरील शाखांना तसेच पक्षाच्या युवक, विद्यार्थी, महिला, शाखांसह सेवादलाला निदर्शने करण्याच्या सुचना पाठवल्या आहेत.
No comments:
Post a Comment