Sunday 27 November 2016

गावकऱ्यांच्या प्रश्न गावातच सोडविण्याचा प्रयत्न



गोंदिया - ‘गाव तिथे मुक्काम ‘ या राज्यशासनाच्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील  केशोरी गावाची निवड करून गावातील समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, पालकमंत्र्यांनी केशोरी गावात रात्रीचा मुक्काम केला.
‘गाव तिथे मुक्काम‘ या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पालकमंत्र्यांना गावात मुक्काम करून गावकऱ्यांचा समस्या जाणून त्या लवकरात लवकर कशा सोडविता येतील, या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. याशिवाय गावातील मुक्कामात गावकऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व यंत्रणेचे जिल्हास्तरीय अधिकारी तसेच तालुका स्तरीय अधिकारी जिल्हाधिकारी उपस्थित राहत असून वर्षानुवर्षे रखडलेले काम आता गावातच होणार असून गोंदिया जिल्ह्यात या उपक्रमाची सुरवात पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.
पालकमंत्र्यांनी या मोहिमेची सुरवात दुर्गम तसेच नक्षलग्रस्त म्हणून समजल्या जाणाऱ्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या केशोरी या गावात मुक्काम करून केली. गावातील लोकांच्या समस्या ऐकत अधिकाèयांना गावकऱ्यांसमोर खडे बोल सुनावले. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तालुका मुख्यालयी राहून गावकèयांच्या समस्या न सोडविल्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही करणार असल्याचे बडोले यांनी सांगितले. थंडीचे दिवस असूनही या कार्यक्रमात जवळपास परिसरातील ८ ते १० गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील रोड ,रस्ते, जलसिंचन,जंगलव्याप्त असलेल्या गावातील अनेक प्रश्न या वेळी गावकèयांनी पालकमंत्र्यांना निदर्शनात आणून दिले. यातील काही प्रश्नांवर तोडगा काढण्यात आला, तर उर्वरित प्रश्न येत्या ८ दिवसात अधिकाऱ्यांमार्फत सोडविले जातील, असे आश्वासन या निमित्ताने या गावकऱ्यांना देण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा काढून शेती करण्याचा सल्ला देखील पालकमंत्री बडोले यांनी गावकऱ्यांना दिला. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...