
सांबा जिल्ह्यातही चमलियालमध्ये अतिरेक्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना, सीमा सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास काही दहशतवाद्यांनी नागरोटा येथील लष्कराच्या १६ व्या तुकडीच्या मुख्यालयावर हल्ला केला. अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि ग्रेनेड हल्लेही सुरू केले. त्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले दोन अधिकारी व जवान नंतर हुतात्मा झाले. या वेळी तीन दहशतवादी ठार झाले.
१२ जवानांसह दोन महिला, दोन मुलांना ठेवले होते ओलीस
नागरोटा येथे पोलिसांच्या वेशात आलेल्या तीन दहशतवाद्यांनी १२ जवान, दोन महिला आणि दोन मुलांना काही काळ ओलिस ठेवले होते. चार तासांच्या चकमकीनंतर या सर्वांची सुटका करून तिघा दहशतवाद्यांना कंठस्रान घालण्यात आले. उरी हल्ल्यानंतर दोन महिन्यांत लष्करी छावणीवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.
No comments:
Post a Comment