देवरी,21- नागपूर येथे होणाऱ्या राज्य शासनाच्या हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर येत्या 8 डिसेंबर रोजी आपल्या संवैधानिक अधिकाराच्या प्राप्ती साठी ओबीसींच्या महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याच्या तयारीसाठी आता ओबीसींच्या रणरागिनींनी देखील कंबर कसल्याचे दिसून येत आहे. या मोर्च्याच्या तयारी निमित्ताने तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांची बैठक येत्या रविवारी स्थानिक सरस्वती शिशू मंदिरात आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय संविधान निर्मात्यांनी भारतातील लोकसंख्येचे सामान्य, इतरमागास वर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती असे चार प्रमुख प्रवर्ग तयार केले. त्यापैकी सर्वात प्रथम स्थान मिळालेल्या ओबीसींसाठी देशात कोणताही आयोग तयार करण्यात आला नाही वा त्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली नाही. परिणामी, ओबीसींच्या हिताचे कोणतेही धोरण स्वातंत्र्यप्राप्ती काळापासून राबविण्यात आले नाही. एवढेच नाही तर ओबीसींची जनगणना करण्यासही सरकार टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे नोकऱ्या, शिक्षण आणि रोजगार या तिनही क्षेत्रात ओबीसी चांगलेच मागासलेले आहेत. ओबीसी वर्ग हा मुख्यत्वे शेतकरी असला तरी त्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चाएवढा मोबदला सुद्धा न देता व्यापाऱ्यांकडून त्याची नेहमीच पिळवणुक होत असते.त्यामुळे मागल्या शिवाय कोणी देणार नाही, हे आता ओबीसींनी चांगलेच ओळखले असल्याने आता आपल्या हक्कासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून राज्यकर्त्याची झोप उडविण्याचे ठरविले आहे.
त्यामुळे आता महिलांनी सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूून आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी या मोर्च्याला यशस्वी करण्याचा विडा उचलला आहे.
भारतीय संविधान निर्मात्यांनी भारतातील लोकसंख्येचे सामान्य, इतरमागास वर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती असे चार प्रमुख प्रवर्ग तयार केले. त्यापैकी सर्वात प्रथम स्थान मिळालेल्या ओबीसींसाठी देशात कोणताही आयोग तयार करण्यात आला नाही वा त्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली नाही. परिणामी, ओबीसींच्या हिताचे कोणतेही धोरण स्वातंत्र्यप्राप्ती काळापासून राबविण्यात आले नाही. एवढेच नाही तर ओबीसींची जनगणना करण्यासही सरकार टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे नोकऱ्या, शिक्षण आणि रोजगार या तिनही क्षेत्रात ओबीसी चांगलेच मागासलेले आहेत. ओबीसी वर्ग हा मुख्यत्वे शेतकरी असला तरी त्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चाएवढा मोबदला सुद्धा न देता व्यापाऱ्यांकडून त्याची नेहमीच पिळवणुक होत असते.त्यामुळे मागल्या शिवाय कोणी देणार नाही, हे आता ओबीसींनी चांगलेच ओळखले असल्याने आता आपल्या हक्कासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून राज्यकर्त्याची झोप उडविण्याचे ठरविले आहे.
त्यामुळे आता महिलांनी सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूून आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी या मोर्च्याला यशस्वी करण्याचा विडा उचलला आहे.
No comments:
Post a Comment