
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने शुक्रवारी विधानसभेसाठी शासकीय विश्रामगृहात इच्छूकांच्या मुलाखती झाल्या, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, कॉँग्रेस, राष्ट्रवादी मधून नेते भाजप-शिवसेनेत उड्यात मारत आहेत, पण तिथे अगोदरच त्यांचे उमेदवार आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. पक्ष असो की व्यक्ती प्रत्येकाचा काही कालावधी खराब असतो. पक्षाध्यक्ष शरद पवार हे ८० व्या वयातही महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांच्या उपकारामुळे अनेकांना आमदार, मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पक्षाची अवस्था वाईट असताना, या वयात पवार यांना सोडणे योग्य नाही. जहाज बुडू लागले की पहिल्यांदा भित्री उंदीरे उड्या मारतात. त्याप्रमाणे ही उंदीरे आणि सध्या पक्षांतर करणा-यांमध्ये फरक तरी काय? अशा काळात मुकाबला करायला हवा, राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यासाठी सज्ज असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment