Sunday 28 July 2019

भूगावजवळ धावत्या शिवशाहीने पेट घेतला


अमरावती : अमरावतीहून परतवाड्याकडे येणाऱ्या शिवशाही बसने भूगावनजीक पेट घेतला. शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

 शिवशाहीमधील अग्निशमनचे सिलिंडर निरुपयोगी ठरल्याने प्रवासी व चालकाने माती टाकून आग विझविली. या घटनेत ३५ प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.
परतवाडा आगाराची बस क्रमांक एम.एच. ०९- ईएम १६३३ क्रमांकाची शिवशाही बस दुपारी साडेतीच्या सुमारास ३५ प्रवासी घेऊन अमरावतीहून परतवाड्यासाठी निघाली. भूगावनजीक ती चार वाजताच्या सुमारास अचानक बंद पडली. चालकाने बस सुरू करण्याचा प्रयत्न करताच स्टेअरिंग जवळून धूर व आगीच्या ज्वाळा निघायला सुर
वात झाली. हा प्रकार पाहून चालक एम.बी. तायडे यांनी तत्काळ सर्व प्रवाशांना बाहेर काढले आणि शिवशाहीतील अग्निशमनचे सिलिंडर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न निष्फळ ठरला. प्रवासी व चालकांनी समयसूचकता ठेवत रस्त्याच्या कडेला असलेली माती टाकून पेटती गाडी विझवण्यासाठी केलेला. हा प्रयत्न यशस्वी ठरला. परतवाडा-अमरावती मार्गावर परिवहन महामंडळाच्या बस दर १० ते १५ मिनिटांच्या अंतराने धावतात. पेट घेतलेल्या शिवशाही बसपुढून दहा मिनिटांत तीन बसेस गेल्या. त्यातील दोन बसेसमध्ये अग्निशमन सिलिंडर नव्हते. तिसरी बस आली त्यात सिलिंडर होते. मात्र तोवर आग आटोक्यात आली होती. अचलपूर तालुक्यातील देवगावचे सरपंच गजानन येवले, उपसरपंच सोनूजी खडके हे या बसमधून प्रवास करीत होते. त्यांनीही आग विझवण्यास मदत केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...