मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याप्रकरणी सतीश उके यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. त्यावर खंडपीठाने निकाल राखून ठेवला आहे.
२०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे प्रकरणांची माहिती लपविल्याचा आरोप याचिकेतून केला आहे. या दोन प्रकरणांची नोंद १९९६ आणि १९९८ मध्ये झाली होती. मात्र, आरोप निश्चित झाला नव्हता. यातील एक गुन्हा फसवणुकीचा आहे. हे गुन्हे लपवून प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा उके यांचा दावा आहे.
या प्रकरणी सुनावणी होऊन सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला. वरिष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तर विवेक तन्खा यांनी याचिकाकर्ते सतीश उके यांची बाजू मांडली.
No comments:
Post a Comment