Tuesday 30 July 2019

सुपलीपार येथे तुटलेल्या वीज तारांमुळे बैलजोडी दगावली.

आमगाव.दि.30 - आमगाव तालुक्यातील सुपलीपार येथे विजेचे तार तुटून  रस्यावर पडल्याने दौन बैल  मृत्यू पावल्याची घटना आज मंगळवारी (दि.30) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर असे की, आज सकाळी साडेसहा वाजता सुपलीपार येथील शेतकरी संतोष नारायण मेंढे हे आपल्या शेतात धान पऱ्ह्याची रोवणी करण्यासाठी निघाले होते. त्यांनी आपल्या मालकीची बैलजोडी सोबत चिखलणीच्या कामासाठी घेतली होती. मात्र, शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून विज वितरण कंपनीच्या वीज वाहिनीचे तार तुटून पडले असल्याने श्री मेंढे यांची बैलजोडी त्या ताराच्या संपर्कात आली . परिणामी, दोन्ही बैल जागीच गतप्राण झाले. सुदैवाने मानवहानी झाली आहे. या घटनेमुळे श्री मेंढे यांचे 50 हजाराचे नुकसान तर झालेच मात्र ऐन शेतीच्या मशागतीच्या काळात त्यांची बैलजोडी दगावल्याने मेंढे कुटुंबीयांवर शेती करण्याचे संकट ओढवले आहे.
वीज वितरण कंपनीचे गलथान कारभार ही नित्याचीच बाब बनली आहे. अभियंते आणि वीज तांत्रिक कर्मचारी हे नेहमी गैरजबाबदारीने वागत असल्याने असे अपघात घडत असतात. त्यामुळे या प्रकरणातील दोषी अभियंत्यावर सुद्धा कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, मेंढे या शेतकऱ्याचे ऐन कामाच्या दिवसात नुकसान झाल्याचे त्याची भरपाई विज वितरण कंपनीने करावी, अशी संतप्त मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...