Friday 21 October 2016

आपल्या दोघांच्या मध्ये कुणीतरी शिरल्याची शंका

 गोंदिया,दि.21 :अंबाटोली परिसरात  राहणार्‍या प्रेमी युगलाने देशी कट्टय़ातून गोळ्या झाडून बुधवारला जीवनयात्रा संपविली. आकाश आणि काजलच्या प्रेमात तिसरी व्यक्ती आल्यामुळे काजल आपल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा राग मनात  घेऊन आकाशने हे कृत्य केल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात आढळून आले.उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते या प्रकरणात स्वत लक्ष घालून तपास करीत आहेत.कारण घटनास्थळावर मिळालेल्या देशी कट्यामूळे या प्रकरणाला थोडी संशयाची धार लागली आहे.या प्रकरणात वापरलेला देशी कट्टा आकाशकडे कुठून आला याचाही शोध पोलीस घेत आहेत. त्याचे फिंगर प्रिंट घेऊन ते परीक्षणासाठी पुण्याला पाठविण्यात आले आहे.आकाश वैद्य आणि काजल मेश्राम यांचे मृतदेह बुधवारी सकाळी गोंदियापासून १0 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवाटोला-घिवारी या गावादरम्यान असलेल्या कालव्याच्या काठावर आढळल्याने खळबळ उडाली होती. आकाशने मंगळवारच्या रात्री काजलच्या डोक्यात गोळी घालून नंतर स्वत:वर गोळी चालवून आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघांचे गेल्या दोन ते अडिच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून काजल पुण्यात गेल्यापासून तिच्यावर आकाशला संशय येऊ लागला. मूळच्या तुमसर (जि.भंडारा) येथील परंतू सध्या पुण्यात असलेल्या एका युवकाशी काजलची मैत्री आकाशला आवडली नाही. त्यामुळे ती आपल्याला सोडून त्याच्यावर प्रेम करीत असल्याचा त्याला संशय येऊ लागला व त्यातूनच हे कृत्य घडल्याचे तपासात पुढे आले.
पोलिसांनी दोघांचेही मोबाईल जप्त केले असून त्यातील माहितीची उकल तज्ज्ञांकडून केली जात आहे. दरम्यान ज्या तरुणावरील संशयातून आकाशने हे कृत्य केले त्या तरुणालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले आहे. त्याने आपल्यात आणि काजलमध्ये केवळ निकोप मैत्रीचे संबंध होते, असे पोलिसांना फोनवरून सांगितले. पण प्रत्यक्ष भेटीत आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...