गोंदिया दि.23: गोंदियाच्या अंबाटोली परिसरात राहणार्या अंकत भास्कर वैद्य (३२)
आणि काजल मेश्राम (२८) यांच्या नवाटोला-घिवारी येथील मृत्यूचा तपास
करताना अंकतने तो कट्टा कुठून आणला याची माहिती पोलिसांपुढे आली आहे.
त्याने मृत्यूपूर्वी आईच्या नावाने लिहून ठेवलेल्या चार ते पाच पानी पत्रात
त्याने या कट्टयाचा उल्लेख केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोंदियाच्या रेल्वेस्थानक परिसरात राहणार्या जगदीश नावाच्या व्यक्तीकडे एकाने कट्टा असलेली पिशवी आणून सोडली व तो पुन्हा न परतल्यामुळे जगदीशने तो कट्टा आपल्याला दिल्याचे त्याने पत्रात म्हटले आहे. रेल्वेस्थानक परिसरात त्याचे बुक स्टॅाल असल्याचेही त्या पत्रात त्याने नमूद केले आहे.
देशी कट्टे पुरविणार्या माफीयापर्यंत पोहोचण्याची योजना पोलीस विभाग करीत आहेत. पोलिसांनी त्या कट्टयावर असलेले फिंगर प्रिन्ट घेतले असून तपासणीसाठी नागपूरला पाठविले आहे.
गोंदियाच्या रेल्वेस्थानक परिसरात राहणार्या जगदीश नावाच्या व्यक्तीकडे एकाने कट्टा असलेली पिशवी आणून सोडली व तो पुन्हा न परतल्यामुळे जगदीशने तो कट्टा आपल्याला दिल्याचे त्याने पत्रात म्हटले आहे. रेल्वेस्थानक परिसरात त्याचे बुक स्टॅाल असल्याचेही त्या पत्रात त्याने नमूद केले आहे.
देशी कट्टे पुरविणार्या माफीयापर्यंत पोहोचण्याची योजना पोलीस विभाग करीत आहेत. पोलिसांनी त्या कट्टयावर असलेले फिंगर प्रिन्ट घेतले असून तपासणीसाठी नागपूरला पाठविले आहे.
No comments:
Post a Comment