Saturday, 15 October 2016

पैसेवाल्यांची आंदोलने यशस्वी होत आहेत: राजकुमार बडोले

औरंगाबाद: कोपर्डीच्या नावाखाली जर अनुसुचित जातींच्या लोकांवर अन्याय होणार असेल, तर तो आम्ही सहन करणार नाही, प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, तसेच आज पैसेवाल्यांची आंदोलनं यशस्वी होत आहेत, असं खळबळजनक वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलं.ते काल औरंगाबादेत इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवलमध्ये बोलत होते.
बडोले यांनी सध्या आरक्षणासाठी निघणाऱ्या मोर्चांवरही जोरदार हल्ला चढवला. ”कोणीही येतं आणि आरक्षणाची मागणी करतं. ज्याच्याकडं पैसे जास्त आहेत, त्यांची आंदोलनं यशस्वी होतात,” असंही ते यावेळी म्हणाले.
बडोलेंच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीने समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बडोले मंत्रीपदाच्या शपथेचं उल्लंघन  करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...