Saturday 24 December 2016

30 डिसेंबरनंतर भ्रष्टाचा-यांसाठी 'बुरे दिन' - पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई, दि. 24 - 50 दिवसानंतर प्रामाणिक माणसांचा त्रास कमी होईल आणि भ्रष्ट, अप्रामाणिक लोकांचा त्रास वाढायला सुरुवात होईल असे महत्वपूर्ण विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वांद्रे-कुर्ला संकुलातील सभेत केले. काळा पैसा सफेद करणा-यांनी बँकांची मदत घेतली तिथेच खरी सुरुवात झाली. त्यांनी स्वत: बरोबर बँक कर्मचा-यांनाही गोत्यात आणले. भ्रष्टाचार करणा-यांना सोडणार नाही, त्यांचे काही चालणार नाही, सरकार बदलले आहे त्यांनी लक्षात घ्यावे असे मोदी यांनी सांगितले.
 
शिवस्मारकाच्या जलपूजन आणि भूमिपूजनानंतर वांद्रे-कुर्ला संकुलात विविध विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी छत्रपती शिवरायांचा जीवनपट प्रेरणादायी असल्याचे सांगितले. देशातील जनता भ्रष्टाचार, काळापैसा सहन करणार नाही, तुम्हाला मोदींची, कायद्याची भिती वाटत नसली तरी चालेल पण तुम्हाला 125 कोटी जनतेचा धाक वाटलाच पाहिजे असे मोदी म्हणाले. हे सरकार भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...