Thursday, 22 December 2016

जिल्हा प्रशासन बेजबाबदार! न.प. ला निधी देण्याचा पीडित कुटुंबाचा शासनाला सल्ला

 

गोंदिया :-  स्थानिक मुख्य बाजारपेठेतील बिंदल थाट-बाट या हॉटेल ला काल लागलेल्या आगीत होरपडून ७ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेतील ११ जणांना सुखरूप वाचविण्यात यश आले आहे. दरम्यान, मृतांच्या कुटूंबियांनी या घटनेला जिल्हा प्रशासन हेच जवाबदार असल्याचा आरोप केला. या अग्निकांडात गोंदियातील अजमेरा कुटूंबातील विवाह समारंभासाठी आलेल्या दोन जावयाचा जळून मृत्यू झाला असून अजमेरा कुटूंबियांनी गोंदिया अग्निशामक विभागाकडे बचाव कार्य करण्यासाठी पुरेशी साधन सामुग्री नसल्याचे सांगत रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंंबीयांना शासनाचे देऊ केलेली मदतनिधी ही नगर परिषदेतील अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यास देण्याचा सल्ला पीडित कुटंबांनी शासनाला दिला.  
गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राच्या टोकावर असून या जिल्ह्याला तीन राज्याच्या सीमा लागून आहेत. या ठिकाणी नेहमीच अस्थायी प्रवाशांची रेलचेल असते. शहराच्या मुख्य बाजार पेठेतून रेल्वे मार्ग जात असल्याने याठिकाणी अनेक व्यवसायिकांनी हाटेल आणि लाजिग रेस्टारेंट थाटले आहे. मात्र कालच्या घटनेमुळे अनेक हाटेल मालक आणि लाज मालकांचे आणि सोबतच अधिकाऱ्याचे पितळ उघडे पडल. शहरातील बहुतांश हाटेल हे गल्ली कोपऱ्यात असल्याने आणि पुरेशी जागा उपल्बध नसताना फायर सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण नसल्याचे स्वतः अग्निशामक अधिकरी सांगत आहेत. हाॅटेल बिंदल थाट या ठिकाणी एकच एक्झिट दार असल्याचे निष्पन झाले आहे. त्यामुळे बचाव कार्य कार्यात मोठा अडथळा आला.   
 गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार,  शहरातील २-३ हाटेल आणि लाज रेस्टारेंट वगळता इत्तर कुठल्याही हाटेल व्यावसायिकाना हाटेल आणि लाज चालविण्याची परवानगी नसल्याचे सांगितले . गोंदिया शहरात जवळपास ५० च्या वर लहान मोठे हाॅटेल आणि लाॅज आहेत. या व्यवसायिकांचे अधिकाऱ्याशी साटे लोटे तर नाही ना असा प्रश्न गोंदियाकरांनी शासनाला विचारला आहे .
ही आग वीझविण्यासाठी अजमेरा कुटूंबियांनी गोंदिया शहर पोलिसांना आणि अग्निशामक विभागाला फोन केल्यानंतर फायर ब्रिगेड गाडी आर्धा तास उशिरा आल्याने आणि हाटेल च्या २०० मीटर अंतरावर शहर पोलिश ठाणे असूनही पोलिस वेळेवर न आल्याने मोठी जिवीत हानी झाली. त्यातही गोंदिया अग्निशामक विभागाकडे बचाव कार्य करण्यासाठी पुरेशी साधन सामुग्री उपलब्ध असती तर आज आगीत होरपळून जळत असलेल्या लोकांना वाचविता आला असता. मुख्यमंत्री साहाय्य निधीतून मृतांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत करण्यापेक्षा गोंदिया नगर परिषदेच्या अग्निशामक विभागांना मदत करून आग नियंत्रण साहित्य खरेदी करण्याचा सल्ला अजमेरा कुटूंबियांनी सरकारला दिला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...