Wednesday, 21 December 2016

'अम्मा'च्या निधनाने 597 जणांचा मृत्यू

चेन्नई (वृत्तसंस्था): माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या निधनामुळे तमिळनाडूत आतापर्यंत 597 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आज एआयएडीएमके यांनी दिली.
पक्षाने दिलेल्या निवेदनात 127 नागरिकांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 597 वर पोचल्याचे म्हटले आहे. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी तीन लाख रुपये देण्याची घोषणा तमिळनाडू सरकारने केली आहे.
'अम्मा'च्या निधनाने शोक अनावर न झाल्याने या नागरिकांचा मृत्यू झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. हे नागरिक चेन्नई, तिरुनेलवेली, मदुराई, रामनाथपुरमसह राज्यातील अनेक शहरांतील रहिवासी होत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...