Wednesday 21 December 2016

...ही तर 'रिव्हर्स बँक ऑफ इंडिया'!

नवी दिल्ली- "रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नोटा बदलण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून मागील 43 दिवसांमध्ये आतापर्यंत 126 वेळा नियम बदलले आहेत. RBI ही आता 'रिव्हर्स बँक ऑफ इंडिया' बनली आहे," अशी टीका काँग्रेसचे संपर्क प्रमुख आमदार रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. 
सुरजेवाला म्हणाले, "8 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या सूचनेचे उल्लंघन करीत त्यांनीच 17 डिसेंबरला सांगितले की, तुम्ही तुमच्या खात्यात 30 डिसेंबरपर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त रक्कम भरू शकणार नाही. आता ते म्हणत आहेत की हा नियम KYC खातेधारकांना लागू होणार नाही. त्यांनी KYC आणि इतर अशी दोन प्रकारची खाती का निर्माण केली? म्हणजे ज्या गरीब लोकांना त्यांची खाती आधार कार्ड किंवा पॅनकार्डला संलग्न करणे शक्य झाले नाही त्यांना आता त्यांच्या कमाईचे पैसे भरता येणार नाहीत."
'हा मोदी सरकारचा दररोज कसला दुतोंडीपणा सुरू आहे? ते स्वतःच संभ्रमात आहेत. आणि त्यांच्या संभ्रमित आदेशांनी आणखी गोंधळ ते निर्माण करीत आहेत,' असे सुरजेवाला म्हणाले. 
तसेच, सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "दररोज 'हेडलाईन मॅनेजमेंट' करणे हा मोदी सरकारचा नियमित काम आहे. जर उद्योगांच्या मालकांना रोख किंवा चेकने वेतन देण्याची मुभा आहे, तर रोजगार कायद्यात दुरुस्ती करणे व्यर्थ आहे."
मोदी सरकारकडे चलनाचा प्रचंड तुटवडा असल्याचे यावरून दिसून येते. त्याची कबुली देण्याऐवजी सरकारने दैनंदिन रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना बँकेच्या रांगांमध्ये उभे राहण्यास भाग पाडले आहे, असे त्यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...