
अजमेरा कुटुंबात आज बुधवारी सायंकाळी 4 वाजता आयोजित विवाह समारंभात त्यांचे इंदोर येथील रविंद्र जैन आणि महू (मध्य प्रदेश ) येथील सुरेंद्र सोनी हे दोन जावई सहभागी होण्यासाठी आले होते.त्यांच्या राहण्याची व्यवस्था या हाॅटेलमध्ये होती.हा विवाहसोहळा सुध्दा एकदम साध्या पध्दतीने साजरा होणार होता.त्यासाठी अजमेरा कुटुबियांनी कुठलाही अधिकचा असा साजसज्जा केलेला नव्हता.छत्तीसगड निवासी दुर्ग येथील मुलीकडील मंडळी ही देवरी येथे येणार होती.हा लग्नसोहळा देवरी येथे पार पडणार होता.त्यासाठी गोंदियातून सकाळी 6 वाजता लग्नाचे वर्हाड रवाना होणार होते,परंतु लग्नसोहळ्याच्या उत्साहावरच विरजण पडले.या घटनेमुळे देवरी येथे होणारा विवाह सोहळा रद्द करण्यात आला असून पालकमंत्री राजकुमार बडोले,खासदार नाना पटोले,माजी आमदार राजेंद्र जैन,जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे,पोलिस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्यासह गणमान्य नागरिकांनी अजमेरा कुटुबिंयाची भेट घेऊन सांत्वना दिली.
पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी या घटनेप्रती शोकसवेंदना व्यक्त करीत घटनेतील मृतांच्या कूटुबिंयाना मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयाची मदत जाहीर केली.
No comments:
Post a Comment