Thursday 22 December 2016

दम असेल तर अटक करून दाखवा : ममता बॅनर्जी

कालाघाट : नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करताना पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट केंद्र सरकारला आव्हान दिले. दम असेल तर मला अटक करून दाखवा, असे सांगताना नोटाबंदीविरोधातील आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही, असे सांगत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
"नोटाबंदीमागे मोठा गैरव्यवहार आहे. यामागे नक्की काय वाटाघाटी झाल्या आहेत, याची माहिती सर्वांना व्हायला हवी. त्यामुळे नोटाबंदीच्या गैरव्यवहारावर आम्ही हजार वेळा बोलणार, असे ममता यांनी एका जाहीर सभेत सांगितले. केंद्र सरकारला उद्देशून बोलताना त्या म्हणाल्या, तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना हात लावाल, तर आम्ही तुम्हालाही सोडणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
नोटाबंदीच्या निर्णयाविरोधातील लढाई लोकांच्या पाठबळावर आम्ही जिंकून दाखवू. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत याविरोधात आवाज उठवत राहीन, असेही बॅनर्जी यांनी या वेळी सांगितले.
केंद्र सरकारच्या प्राप्तिकर विभागाने नुकतेच तमिळनाडूचे प्रधान सचिव पी. राममोहन राव यांच्या घरी छापा टाकला होता. याबद्दल बोलताना बॅनर्जी यांनी ही कारवाई अनैतिक असून, सूडबुद्धीने केलेली असल्याचे या वेळी सांगितले.
केंद्र सरकार साधूचा आव आणत आहे
केंद्र सरकारच्या ढोंगी कारभारावर ममता बॅनर्जी यांनी थेट टीका केली. केंद्रातील नेते साधू असल्याचा आव आणत असून, इतरांना चोर ठरविण्याचे कारस्थान सुरू असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...