Saturday 17 December 2016

रामदेव बाबांचा ‘नाराज’योग; म्हणे, तीन ते पाच लाख कोटींचा घोटाळा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर उद्भवलेल्या चलनसमस्येने सर्वसामान्यच नव्हे तर, कधीकाळी काळ्या पैशांविरोधात लढा देणारे योगगुरू रामदेव बाबांनीही नाराजी व्यक्त केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी तीन ते पाच लाख कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
जयपूरमधील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी ‘द क्विंट’ या वेबसाइटला विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांनी आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. नोटाबंदीचा निर्णय ‘फ्लॉप’ झाल्याचेही ते म्हणाले. नवीन नोटांच्या पुरवठ्यात मोठा घोटाळा झाला आहे. हा घोटाळा तीन ते पाच लाख कोटींचा असू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी हजारो नव्हे, तर लाखो कोटी रुपयांची छपाई केली आहे. त्यात तीन ते पाच लाख कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर येईल, असेही ते म्हणाले. रोख रकमेची कमतरता नव्हती. सर्वच्या सर्व रोकड बेईमानी लोकांना देण्यात आली. या व्यवस्थेत अजूनही काही सुधारणा होऊ शकतात, असेही ते म्हणाले. बँकेतील अधिकारी बेईमान असू शकतात, असे मला वाटते. असा प्रकार होणे हे दुर्दैवी आहे. देशाच्या कारभारावर गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...