Sunday 1 October 2017

*नागपूरमुळे भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विकास पागल झाला आहे- खा.नाना पटोले


*पुन्हा खासदार नाना पटोले यांनी दसरा उत्सवात केंद्र व राज्यशासनावर डागली तोफ*
लाखनी ३०:भंडारा गोंदिया क्षेत्राचा विकास काही मोट्या राजकारण्यांनी जाणून बुजून हेतूपूरस्पर अडकऊन ठेवला आहे आणि त्याच कारणामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यात सुद्धा विकास पागल झालेला आहे आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यात विकास पागल होण्यामागे मुख्य कारण म्हणजे नागपूर आहे असा घणाघाती आरोप खासदार नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे आयोजित दसरा उत्सवा निमित्त केला आहे.
नाना भाऊ पुढे बोलतांना बोलले की भंडारा गोंदिया क्षेत्रात विकास खुंटलेला आहे . अदानी विडिओकॉन सारख्या कंपण्या असून सुद्धा त्याच्या फायदा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना झाला नाही त्यामुळेच सतत क्षेत्रामध्ये बेरोजगारी वाढत चालली आहे.साकोली तालुक्यात लवकरच भेल कंपनीचा शुभारंभ करणार अशे सुद्धा त्यांनी सांगितलं भेल चे सर्व अडथळे दूर करण्यात यश आले आहे आता लवकरच  क्षेत्रातील अडीच ते तीन हजार बेरोजगार युवकांना रोजगार मिडेल अशे त्यांनी सांगितलं.
         खासदार नाना पटोले यांनी म्हटलं की नोट बंदी व जिएसटी मूळे मंदीचा सावट आहे.जिएसटी मुळे व्यापार मंदावले आहेत  पेट्रोल 35 ते 40 रुपयांच्या दराने उपलब्ध व्हायला पाहिजे परंतु सरकारने पेट्रोल चे दर 80 रुपये प्रति लिटर करून सामान्य नागरिकांची कंबर मोडली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात जिएसटी व पेट्रोल मुळे मिडनाऱ्या कराचा उपयोग किती प्रमाणात सामान्य नागरिकांना होतो याच जाब येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला विचारणार अशे म्हटले . सरकारच्या मनमानी कारभारामूळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे लवकरच जिल्ह्याच्या व महाराष्ट्राच्या विकासा च्या दृष्टीने नवीन पाऊल उचलण्याच्या प्रयन्त करू त्यात आपला मुलगा आपला भाऊ समजून मला आशीर्वाद द्याल हे सुद्धा खासदार नाना भाऊ पटोले सांगण्यास विसरले नाहीत. नाग नदीच्या पाण्यामुळे गोसे खुर्द चा पाणी अशुद्ध होत चालल आहे त्यामुळेच त्यावर सुद्धा उपाययोजना करू व  लवकरच भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात गोसे खुर्द चा पाणी पोहचवू त्याचप्रकारे ऑनलाइन प्रकियेमुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडालेली आहे  अशे खासदार नाना पटोले बोलले.दसरा उत्सवाच्या कार्यक्रमात साकोली विधानसभेचे भाजप  चे  आमदार बाळाभाऊ काशीवर उपस्थित होते मात्र नागपूर मध्ये आयोजित एका कार्यक्रमात नाना भाऊ यांनी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपामुळे विधानपरिषदेचे भाजप चे आमदार परिनय फुके यांची गोची झाली होती त्यामूळे आज पुन्हा एकदा नाना भाऊ दसरा उत्सवाच्या कार्यक्रमातून नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या वर तोफ डागनार ह्या भीतीमुळेच दसरा उत्सवाच्या कार्यक्रमाला भाजप चे आमदार परिनय फुके  उपस्थित राहिले नाही अशी चर्चा जणसामान्यात रंगली आहे . येणाऱ्या काळात नाना भाऊ कशापद्धतीने सरकारला घरचा अहेर देतील हे बघायचं आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...