Tuesday, 6 December 2016

मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांच्या प्रतिमेला वकिलांनी घातला हार

पुणे, दि. 6 : उच्च न्यायालयाचे पुण्यात खंडपीठ स्थापन करण्याबाबतचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुर करण्याचे दीड वर्षांपूर्वी दिलेले आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी अद्याप पाळले नाही. त्यामुळे पुणे बार असोसिएशनच्या वतीने त्या दोघांच्या प्रतिमेला हार घालून आणि आरती करून अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले. नवरात्रीप्रमाणे नऊ दिवस वेगवेगळ्या पध्दतीने फडणवीस आणि बापट यांच्या प्रतिमेची आरती करण्यात येणार आहे. खंडपीठाबाबत त्वरित निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. वाय.जी.उर्फ आबासाहेब शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...