नितीन गडकरी यांच्या हस्ते आज जालन्यातील वाटूर येथे शेगाव-पंढरपूर, दिंडी आणि वाटूर फाटा ते परभणी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरदेखील उपस्थित होते.
' देशभरात आजवर मी इतकी काम केली असताना ठेकेदार कोण असतो? हे मला माहित नसतं. आजवर एकाही ठेकेदाराच्या पैशाचा मी मिंदा नाही', असं नितीन गडकरी बोलले आहेत. सोबतच शेगाव-पंढरपूर रस्त्याचं काम चांगलं झालं पाहिजे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. 'रस्त्याचं काम चांगलं होत नसेल, तर फक्त मला कळवा. या ठेकेदाराला मी बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही', असा इशाराच गडकरींनी यावेळी दिला आहे.
No comments:
Post a Comment