Wednesday 29 November 2017

राजकीय नेते,व सामाजिक कार्यकर्त्यांचा मध्यप्रदेशच्या वाळू माफियांना संरक्षण

गोंदिया जिल्ह्यात मध्यप्रदेशातील वाळू माफियाचा शिरकाव


मध्यप्रदेशातील मुंडेश्वरा घाटातील वाळूची महाराष्ट्रात विक्री

पर्यावरण विभागाच्या नियमांना तिलांजली हजारो ट्राली वाळूच्या साठ्याला एमपी सरकारचे संरक्षण


गोंदिया,(खेमेंद्र कटरे) दि.२९- गोंदिया जिल्ह्यातील वाळू तस्करी प्रकरणाने आता गुन्हेगारी वळण घेतल्याने नागरिक आणि वाळू माफियांमध्ये वाद निर्माण होत असल्याच्या प्रकरणात वाढ होत असल्याचे चित्र आहे. वाळूचा उपसा करून त्याचा अवैध साठा वाळू तस्कर करीत असून त्याचा राज्याच्या महसुलावर चांगलाच परिणाम होत आहे. यामध्ये राजकीय आणि प्रशासनातील लोकांचे हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
दरम्यान, वाळूची आंतरराज्यीय तस्करी सुद्धा वाढल्याचे समोर येत आहे.त्याचे असे की,जिल्ह्याच्या सीमेवरुन वाहणाèया वाघनदीकाठावरील काही घाट हे वाळूसाठी निश्चित केले आहेत.त्यापैकी बनाथरजवळील बडेगाव गावाशेजारून वाहणाèया नदीपात्रातील मुंडेश्वरा घाटातून वाळूचा उपसा मध्यप्रदेशातील कंत्राटदाराने महाराष्ट्राच्या भागात केला असला तरी ती जागा मात्र मध्यप्रदेश सरकारची असल्याने महाराष्ट्राला त्यात कारवाई करता येत नाही.जो साठा वाळूचा करण्यात आला आहे,तो साठा मात्र महाराष्ट्राच्या रस्त्याशिवाय होऊ शकत नसल्याच्या तक्रारीवर चौकशी सुध्दा झाली होती.परंतु त्या चौकशीत बालाघाट जिल्हाधिकारी यांच्यानुसार व डीएलआरच्या मोजणीत साठा केलेली जागा मध्यप्रदेशची असल्याने महाराष्ट्राचे प्रशासन कारवाई करु शकत नसल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी फुलेकर यांचे म्हणने आहे.तर तत्कालीन गोंदिया ग्रामीणचे तहसिलदार के.डी.मेश्राम यांच्यानुसार मौका तपासणी व सर्वेक्षण केल्यावर ती जागा मध्यप्रदेश सरकारची निघाल्याने महाराष्ट्राला कारवाईचे अधिकार नाहीत,तसेच बालाघाट जिल्हाधिकारी यांनी साठवणुकीसाठी ती जागा कंत्राटदाराला लीजवर दिली असल्याची माहिती दिली.
मुंडेश्वरघाटातून साठवणूक केलेली वाळू ही गेल्यावर्षीपासून असून अंदाजे १५०० ते २००० ट्रक्टर ट्राली एवढा साठा आहे.तो ८०० रुपये ट्रक्टरप्रमाणे विनारायल्टीने विक्रीही केली जात असून बहुतांश वाळू महाराष्ट्रातच येत आहे.या घाटावरील वाहतुकीमुळे बनाथरपर्यंतचा किमान ५ किलोमीटरचा रस्ता पुर्णत खराब झालेला आहे.विशेष म्हणजे या वाळूघाट कंत्राटदाराला राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या कार्यकत्र्यासोंबतच समाजसेवेचा ढोंल पिटणाèया काही संघटनांच्या प्रमुखाचाही सहभाग असल्याने समाजसेवेच्या नावावर जनतेसमोर वावरणारे वाळूमाफियासांठी मात्र दलालीचा काम करतात की काय अशी परिस्थिती गोंदिया जिल्ह्यातील अनेक घाटांचा अभ्यास केल्यावर बघावयास मिळते.
गोंदिया जिल्ह्यातून वाहणाèया वाघनदी ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्याच्या सीमेवरून वाहते. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या असलेल्या वाळूघाटावरून वाळूचा उपसा होत असतो. दरम्यान वाळू व्यवसायामध्ये महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील अनेक लोक उतरले आहेत. वाळू कंत्राटदारांसाठी रॉयल्टी संबंधाने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश येथील नियमांत भिन्नता आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील अनेक कंत्राटदारांचा महाराष्ट्राच्या सीमेतील वावर वाढला आहे. मध्यप्रदेशातील वाळू माफिया वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणावर करीत असून त्याचा साठा मध्यप्रदेशातील भूभागावर करीत असतो. यासाठी तेथील प्रशासनाने अशा कंत्राटदारांना वाळूचा साठा करण्यासाठी जमीन भाड्याने उपलब्ध करून दिल्याची माहिती आहे. अशी साठवणूक केलेल्या वाळूची वाहतूक महाराष्ट्रात होत असल्याने महाराष्ट्र राज्याचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडविला जात आहे. मध्यप्रदेशातील वाळू माफिया ही तस्करी लपविण्यासाठी महाराष्ट्रातील काही वाळूघाट लिलावात सहभागी होत असून येथील रॉयल्टी पासेसचा ते वापर करून मध्यप्रदेशातील रेतीची महाराष्ट्रात वाहतूक करीत असल्याचे वृत्त आहे. याकडे गोंदिया जिल्ह्यातील प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप होत आहे.
वाघनदीच्या पात्रातून होत असलेल्या वाळूचा मोठ्या प्रमाणावर साठा केला जातो. नंतर त्यांची वाहतूक करून मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. यामुळे आता वाळूमाफियातील वादाने गुन्हेगारी वळण घेतले आहे. अनेक ठिकाणी नागरिक आणि वाळू तस्कर यांच्यात मारहाणीचे प्रकारात सुद्धा वाढ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील वाळूघाट खरेदीमध्ये मध्यप्रदेशातील शिवा गृपने सुद्धा घुसखोरी केली आहे. या ग्रुपचा संबंध थेट मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या निकटवर्तीयांशी जोडला जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील भाजपच्या नेतेमंडळींचा सुद्धा मोठ्याप्रमाणावर सहभाग आहे. यामुळे स्थानिक प्रशासन वाळूतस्करीविरुद्ध कार्यवाही करण्यात कमकुवत ठरत असल्याचे बोलले जाते. काही दिवसापूर्वी घडलेल्या एका घटनेत तर एका नेत्याचा खास कार्यकत्र्यालाच नागरिकांनी बदडले होते. या वाळू तस्करांनी तर आता गुंडप्रवृत्तीचा स्वीकार केल्याने पोलिसांची सुद्धा डोकेदुखी वाढली आहे. हे गुंड गावात घुसून नागरिकांना सुद्धा चोप देत असल्याने बनाथर येथे नागरिकांनी एकत्र येऊन या गुंडांना चांगलीच अद्दल घडविल्याचे उदाहरण आहे. या प्रकरणात मध्यप्रदेशातील वाळूमाफियांना चोप बसल्याने त्यांनी पळ काढला होता. तर ओळखीचा फायदा घेत स्थानिक वाळूतस्कर यांंंनी आपला जीव वाचविला होता. याप्रकरणी नागरिक आणि वाळू माफिया अशा दोघांवरही पोलिसांनी गुन्हा नोंदविला. या मारहाणीत भाजपच्या काही पदाधिकाèयांचा सुद्धा समावेश असल्याची चर्चा होती. तेढवा येथे असाच प्रकार मागे झाला होता. यात धारदार हत्यारांचा सुद्धा वापर वाळूमाफियाने स्थानिक नागरिकांविरुद्ध केला होता.
वाघनदीच्या पात्रातून वाळूचा उपसा मोठ्याप्रमाणावर करून त्याचा अवैध साठा केला जातो. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सत्ताधारी पक्षाचे अनेक कार्यकर्ते यात गुंतले असल्याने महसूल विभाग त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सुद्धा अनेक वेळा केला जातो. अशा वाळूसाठ्याची बोगस रॉयल्टीच्या आधारे वाहतूक केली जाते. वाळूमाफिया आणि महसूल अधिकारी यांच्यात मिलीभगत असल्याने सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडविला जात आहे. तर दुसरीकडे हे वाळूमाफिया नागरिकांत दहशत निर्माण करण्यासाठी गुंडगिरी करीत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून समजते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...