Wednesday 29 November 2017

नरेगाच्या लाभार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा- मनोज हिरूडकर



देवरीचे गटविकास अधिकारी यांचे पत्रपरिषदेत आवाहन

देवरी,दि.२८- महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये ९० दिवस कामाची अट पूर्ण करणाèया मजुराच्या कुटुंबीयांसाठी शासनाने अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. परंतु, या योजनांची माहिती अद्यापही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचली नाही. परिणामी, अशा अनेक योजना या कागदावरच राहतात. या योजनांनी माहिती नागरिकांना व्हावी आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी मजुरांनी पुढे यावे, आम्ही अशा लाभाथ्र्यांना मदत करण्यास सदैव तत्पर आहोत, असे प्रतिपादन देवरीचे गटविकास अधिकारी मनोज हिरूडकर यांनी केले.
ते गटविकास अधिकारी कक्षात आयोजित पत्रपरिषदेत पत्रकारांशी औपचारिक चर्चा करताना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शासन नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवीत असते. पण प्रसिद्धी प्रचाराच्या अभावाने अशा योजनांची माहीत जनसामान्यांना राहत नाही. परिणामी,गरजवंतांना त्याचा लाभ पोचत नसतो. यासाठी माध्यमांनी अशा योजना जनतेपर्यंत पोचविण्याचे कार्य करावे, अशी रास्त अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. यावेळी शाखा अभियंता मनोहर मडावी हे उपस्थित होते. नरेगा कार्यक्रमांविषयी माहिती देताना श्री.हिरूडकर यांनी मनरेगा अंतर्गत ज्या मजुरांनी ९० दिवस काम मिळण्याची अट पूर्ण केली असेल, अशा मजुराला व त्याच्या कुटुंबीयांसाठी १९ कल्याणकारी योजना शासन राबवीत आहे. अशा मजुरांची नोंदणी महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये करण्यात येते. अशा नोंदणी झालेल्या लाभार्थीला त्याच्या पत्नीच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी १५ हजार तर शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी २० हजार, लाभाथ्र्यांच्या दोन पाल्यांना इयत्ता १ ते ७ पर्यत २ हजार ४०० आणि इयत्ता ८ ते १० पर्यंत ५ हजार दरवर्षी शैक्षणिक साहाय्य, १०वी व१२वी मध्ये ५० टक्के गुण मिळविणाèया पाल्यांना १० हजार शैक्षणिक साहाय्य, दोन पाल्यांना ११ वी व १२वीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष १० हजार, कामगाराच्या २ पाल्यांना वा पत्नीस पदवी शिक्षणासाठी प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक साहित्यासाठी प्रतिवर्ष २० हजार तर वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी १ लाख आणि अभियांत्रिकीच्या पदवी शिक्षणासाठी ६० हजार शैक्षणिक साहाय्य याशिवाय पदविका शिक्षणासाठी प्रती वर्ष २० हजार आणि पदव्युत्तर पदविकेसाठी २५ हजार, कामगार कुटुंबाने एका मुलीवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत १ लाख मुदत ठेव (एफडी), कामगारास अपंगत्व आल्यास २ लाखाचे साहाय्य, कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी १० हजार तातडीची मदत,कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पती वा पत्नीस प्रतिवर्ष २४ हजार ५ वर्षे मदत, कामगाराचा कामावर मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास ५ लाखाचे आर्थिक साहाय्य, कामगार वा त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी १ लाखाचे साहाय्य, संगणक शिक्षण घेणाèया दोन पाल्यांना शुल्काची परिपूर्ती, कामगाराच्या पहिल्या विवाहासाठी ३० हजाराचे साहाय्य, ३१ ऑगस्ट २०१४ रोजी नोंदणी जीवित असलेल्या कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी  प्रती कामगार ३ हजार, कामगाराच्या पाल्यांना शैक्षणिक उपयोगाच्या पुस्तक संचाचे वाटप, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत कामगारांसाठी अवजारे खरेदीसाठी दर तीन वर्षांनी प्रती कुटुंब ५ हजाराचे साहाय्य आणि व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचारासाठी ६ हजाराचे आर्थिक साहाय्य अशा कल्याण योजना सुरू आहेत. या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ शासनाने मनरेगाची १०० दिवस काम करणाèया आणि नोंदणीकृत कामगारांसाठी  सुरू केल्या असून कामगार बांधवांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन गटविकास अधिकारी हिरुडकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...