Friday 24 November 2017

अट्टल मोबाईल चोरट्यांना अटक; रेल्वे सुरक्षा आयुक्तांची माहिती

गोंदिया,दि.24ः- रेल्वेचा प्रवास सुरक्षीत व भयमुक्त वातावरणात व्हावा, यासाठी रेल्वे सुरक्षा दलातर्फे निरंतर वाढणार्‍या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवून रेल्वे प्रवाशांना पूर्ण सुरक्षा देणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी दिली.

दरम्यान, आयुक्त श्री पांडे यांनी गोंदिया रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणार्‍या तीन आरोपींना अटक केले असून त्यांच्याजवळून २0 महागडे मोबाईल जप्त केल्याची माहिती दिली. शाहरूख, रशीद व विक्की असे आरोपींची नावे असून तिघेही गोंदियाचे रहिवासी आहेत. यातील विक्की याच्यावर वेगवेगळय़ा आरोपाखाली गुन्हा दाखल असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. श्री सिंह यांनी सांगितले, आरोपींना जप्त केलेले महागड्या २0 मोबाईलचे आईएमआई क्रमांक बदलविण्यात यश न आल्यानेच त्यांची विक्री करण्यात आरोपींना यश मिळाले नाही. तिन्हा आरोपींची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती दिली.
यावेळी त्यांनी या दौर्‍यादरम्यान रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल चोरी करणार्‍यांना अटक केल्याची माहितीही दिली. आशुतोष पांडे यांनी शुक्रवारी (दि.२३) गोंदिया रेल्वेस्थानकाला भेट देऊन गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाच्या कामाचे निरीक्षण केले. दरम्यान, पत्रकार परिषदेचे आयोजन करून रेल्वे सुरक्षा दलाच्या कामाबद्दल पत्रकारांना माहिती दिली.
यावेळी गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाचे प्रभारी अधिकारी बी.एन.सिंग उपस्थित होते. यावेळी त्यांनी रेल्वे सुरक्षासंदर्भात रेल्वे सुरक्षा दलातर्फे करण्यात येणार्‍या कामांची माहिती दिली. त्यांनी सांगितले, रेल्वेगाड्यात अवैधरित्या खाद्यान्न विकणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येत असून सुरक्षा दलाच्या जवानांना रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नियमीत गस्तीसोबतच जबाबदारीची जाणीव ठेवून कर्तव्य पार पाडण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...