Friday 24 November 2017

लिहिलेल्या नोटा घ्याव्याच लागतील: रिजर्व बॅंक



नवी दिल्ली,दि.24 - ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांवर काही लिहिलेलं असलं तरी आता चिंता करण्याची गरज नाही. त्या नोटाही बँकांना स्वीकाराव्या लागतील, असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. त्या नोटा बदलून घेता येणार नाहीत, पण संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करता येणार आहेत, असंही बँकेनं स्पष्ट केलं.


५०० आणि २००० रुपयांच्या नोटांवर काही लिहिलेलं असल्यास त्या बँकांमध्ये स्वीकारल्या जात नाहीत. यामुळे बँक कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये खटके उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. लिहिलेल्या नोटा वैध की अवैध याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेनं हा संभ्रम दूर केला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात येणाऱ्या लोकांना याबाबत जागरुक करण्यात येत आहे. नोटांवर काही लिहिलं असल्यास किंवा त्यावर रंग लागला तरी त्या वैध आहेत. त्या स्वीकारण्यास बँका नकार देऊ शकत नाहीत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

ग्राहकांना त्या नोटा बँकांतून बदलून घेता येणार नाहीत. पण आपल्या वैयक्तिक खात्यात जमा करू शकतात, असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. बनावट नोटा ओळखता याव्यात यासाठी लोकांना नोटांवरील फीचर्ससंबंधी माहिती देण्यात येते. २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांवर १७ फीचर आहेत. तर ५० रुपयांच्या नोटेवर १४ फीचर असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. अनेक दुकानदार १० रुपयांचं नाणं स्वीकारत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. पण ते नाणं वैध आहे. यासंबंधी मेळाव्यात अधिसूचना लावण्यात आली आहे. तसंच डिजिटल व्यवहार करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...