Sunday 27 October 2019

अवकाळी पावसाचा धान पिकांना फटका-राष्ट्रवादीचे निवेदन

सडक अर्जुनी,दि.27 :गोंदिया जिल्ह्यात तीन चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा धान पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. पावसामुळे कापणी केलेले धान भिजल्याने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावल्या गेल्या. यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका सडक अर्जुनी तालुक्यातील पुतळी येथील शेतकऱ्यांना बसला. खरीप हंगामातील हलका धान निसवला असून कापणीचा हंगाम सुरू आहे. शेतकरी दिवाळीपूर्वी हलक्या धानाची कापणी करुन तो विक्रीसाठी आणणू दिवाळी साजरी करतात. मात्र तीन चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणी केलेले धान भिजले.काही भागात जोरदार पाऊस झाल्याने बांध्यामध्ये पाणी साचल्याने धान सडला. त्यामुळे धानाच्या कळपा काळ्या पडला असून धान पाखड झाला.अवकाळी पावसाचा चारशे ते पाचशे हेक्टरमधील धान पिकाला बसला.यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी तहसीदारांना दिलेल्या निवेदनातून केली. शिष्टमंडळात जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर,डॉ.अविनाश काशिवार, प्रमोद लांजेवार, चंद्रसेन कापगते, ग्यानीराम कापगते, देवाजी पर्वते, शिवदास डोंगरवार,विनायक डोंगरवार,शांतीलाल कापगते,गुलाब डोंगरवार यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील गोंदिया, अर्जुनी मोरगाव, देवरी,आमगाव, सालेकसासह इतर भागात सुध्दा शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात एक ते दीड तास पाऊस झाल्याने याचा या भागातील धानपिकांना सर्वाधिक फटका बसला.सध्या खरीप हंगामातील धानाची कापणी सुरु आहे. मात्र शनिवारी झालेल्या पावसाचा फटका कापणी करुन बांध्यामध्ये ठेवलेल्या धान भिजला. बांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कापणी केलेल्या धानाच्या कळपा भिजल्या. त्यामुळे धान पाखड होण्याची शक्यता आहे.तर शेतामध्ये उभा असलेला धान सुध्दा पाऊस आणि वाऱ्यामुळे झोपला. यामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.यावर्षी धान पिकाच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण मिळाल्यामुळे पिकांची चांगली वाढ झाली. त्यामुळे यंदा बंफर उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र अवकाळी पावसाचा धान पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...