Thursday 24 October 2019

गोंदियात विनोद अग्रवालांनी एैतिहासिक विजय मिळविला

गोंदिया,दि.24ः–महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकालाला सुरवात झाली असून राज्यात पुन्हा भाजप सेना सरकार स्थापन करण्याकडे वाटचाल करीत आहे.त्यातच गोंदिया भंडारा जिल्ह्यात धक्कादायक निकाल आले असून गोंदिया मतदारसंघात आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच अपक्ष उमेदवाराच्या रुपात विनोद अग्रवाल यांनी सुमारे 28 हजाराच्यावरील मताधिक्याने विजय मिळविला आहे.या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार कधीही आजपर्यंत निवडून आलेला नव्हता त्यातही एवढ्या मताधिक्यानेही कुणीच निवडून आलेला नव्हता.
यावेळी मात्र विनोद अग्रवालांना जनतेने भरभरुन देत विधानसभेत पाठविले आहे.त्यांच्या विजयाचा आकडा जसजसा वाढत चालला तसतसा गोंदिया शहरासह मतदारसंघातही जल्लोषाचे वातावरण सुरु झाले होते.8 व्या 9 व्याराऊंडपासूनच शहरात फटाकेफोडून जल्लोषाला सुरवात झालेली होती.अतिंम आकडेवारी जाहिर होताच जिल्हाक्रिडा संकुल परिसरातून विनोद अग्रवाल यांची भव्य मिरवणुक शहरात काढण्यात आली.त्यापुर्वी त्यांच्या निवासस्थानासमोर फटाकेफोडून कार्यकर्ते व नातेवाईकांनी जल्लोष साजरा केला.त्यांच्या या मिरवणुकीत शिव शर्मा,घनश्याम पानतवने,दिपक बोबडे यांच्यासह अनेक भाजपाचे नेते सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे आमदार गोपालदास अग्रवालांनी मुख्यमंत्री प्रेमापोटी घेतलेला निर्णय त्यांच्यावर उलटला असून मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात दोन शिकार या निवडणुकीत केले आहे.अग्रवालांना भाजपात घेऊन काँग्रेसला कमजोर करीत मतदारसंघातून काँग्रेसलाही संपविले आणि पक्षात घेऊन त्यांना पराभूत करुन त्यांचे राजकारणही संपविल्याचे बोलले जात आहे.अग्रवाल हे काँग्रेसमधूनच लडले असते तर त्यांना भाजपही पराभूत करु शकली नसती हे भाजपलाही ठाऊक होते,त्यामुळेच त्यांना पक्षात घेण्यात आल्याचे म्हटले आहे.गोपालदास अग्रवाल यांना मिळालेल्या मताकंडे लक्ष दिल्यास ती सर्व मते काँग्रेसची असल्याची दिसून येत असून भाजपची 2 टक्क्ेच्यावर मते त्यांना मिळालीच नसल्याचा अंदाज आहे.भाजपची सर्व मते ही अपक्ष विनोद अग्रवाल यांच्याबाजूनेच गेल्याचे निकालावरुन दिसून येते तर काँग्रेसचे उमेदवार अमर वराडे यांनी 3 हजाराच्या जवळपास मते मिळणे हे सुध्दा खुप काही राजकीय गणित सांगणारे ठरले आहे.तर युवा स्वाभीमानचे जितेश राणे सुध्दा काहीही कमाल करु शकले नाही.विनोद अग्रवाल यांच्या विजयाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामध्येच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये सुध्दा मोठा उत्साह व जल्लोष दिसून येत आहे.शहरातील विविध भागात फटाकक्यांची आतिषबाजी सुरु आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...