
ते नागपूर येथे धनवटे नॅशनल कॉलेजमधील डॉ. भाऊसाहेब देशमुख सास्कृतिक सभागृहात आयोजिक ओबीसी विद्यार्थी आणि युवक यांच्या महाअधिवेशनातील दुसऱ्या सत्रात बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या देशात आजही चुकीचे शिक्षण दिले जात आहे. शिक्षणात मानव थिअरीचा अभाव असून जान्हव थिअरीचा प्रभाव आहे. त्यामुळे योग्य ज्ञानापासून आपण वंचित आहोत. एकीकडे आपण बळिराजाला मानतो तर दुसरीकडे आपण त्याच बळिराजाची हत्या करणाऱ्या वामनाची पुजा करतो, हीच खरी विंडबना आहे. हे कसले विचार आपल्यावर लादले जात आहेत. फुले दाम्पत्यांनी दलितांसाठी शाळा सुरू केली असे लिहून ठेवले आणि तेच आजही शिकवले जाते. पण आपण आज सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. गांधीजींची हत्या एका माथेफिरूने केली असे भासवले जाते,मात्र त्याची जात प्रामुख्याने लपविली जाते, याचा आपण विचार करण्याची गरज आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना मेघा रामगुंडे म्हणाल्या की, समाजातील युवकांनी आता पुढे आले पाहिजे. विविध राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये आपल्या संत्याचे विचार मांडण्यासाठी आपल्या विद्वत्तेचा वापर करावा लागणार आहे. जयपराजयाचे कारण आपणच असतो. कौशल्य असेल तर आरक्षणाची गरज पडणार नाही. भारतीय संसद या वक्ते तयार करणाऱ्या ठिकाणी आरक्षणाने नव्हे तर गुणवत्तेच्या आधारे निवड झाली पाहिजे. गरिबीत मेलात तर तुमची चूक आहे, तुमच्या आईवडीलांची नाही. मुलगा मुलगी भेदभाव करू नका. युवकांमध्ये कौशल्य आहे. त्याला त्या त्या क्षेत्रात पुढे येऊ द्या, असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
No comments:
Post a Comment