यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत पटले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने नगर पालिकेच्या निवडणुकीत रस्ते, सौंदर्यीकरण, नाली, शुद्ध पाणी, भूमिगत गटार योजना आदींची कामे करण्याचे आश्वासन दिले होते. पालिकेने कामांचे नियोजन करावे. आमच्यावर मतदारांनी विश्वास दाखवून निवडून दिले. मात्र आम्ही संकल्प पूर्तीसाठी निधी खेचून आणू, नागरिकांच्या मनातील गोंदिया घडविण्याचा आमचा संकल्प आहे, असे पटले म्हणाले.सभापती दिलीप गोपलानी म्हणाले, शहरात 3 नवीन बगीचे, शहरात 3000 led स्ट्रीट लाईट, रस्ते तयार होणार आहेत. चालू आर्थिक वर्षात 60 कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. प्रास्ताविक दीपक कदम,संचालन चंद्रभान तरोने यांनी तर आभार पालिकेच्या सभापती भावना कदम यांनी मानले.यशस्वितेकरिता अजय इंगळे, सतीश चौहान, बबन येटरे, नवरत्न अग्रवाल, मंजले यादव, संजय इंगळे, पुनजी लिलहारे, हासानंद गोपलानी, मनोहर ठाकूर, सुनील तिवारी, पप्पू अरोरा, शैलेंद्र मिश्रा, पंडित नरेंद्र शुक्ल, रमण मिश्रा, मनोज मेंढे, मोती कुरील, किशोर व्यास, प्रल्हाद विश्वकर्मा, पिंकी तिवारी, योगेश गिरीया, कार्तिक यादव, भरत कानोजिया, सुमित तिवारी, राम पुरोहित आदींनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment