Friday 8 December 2017

सदाभाऊ खोत, राजकुमार बडोले यांची भेट घेऊन शेतकऱ्याने संपवले आयुष्य



अकोला,दि.08- राज्याचे मंत्री सदाभाऊ खोत, राजकुमार बडोले यांची भेट घेऊनही प्रश्न न सोडवल्याने कर्जबाजारी शेतकर्‍याने आयुष्‍य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात ही घटना घडली आहे. ज्ञानेश्वर मिसाळ असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.ज्ञानेश्वर मिसाळ यांच्यावर आयसीआयसीआय बँकेचे 2.5 लाख, मुथूट फायनान्सचे 1.5 लाख कर्ज होते.दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथे तरुण शेतकर्‍याची कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...