Wednesday, 7 December 2016

बॅंकेच्या रांगेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत

लखनऊ, दि. 7- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नोटबंदीनंतर बॅंक आणि एटीएमच्या रांगेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रूपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्याकडून ही माहिती देण्यात आली. 
चलनातून बंद करण्यात आलेल्या जुन्या 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा बदलता न आल्याने अलीगढमधील रझिया या 45 वर्षीय महिलेने 20 नोव्हेंबररोजी स्वत:ला जाळून घेतले होते. 4 डिसेंबरला रझिया यांचा दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला. रझियांच्या कुटुंबीयांना उत्तरप्रदेश सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत  देण्याची घोषणा अखिलेश यादव यांनी केली.
आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये किती जणांचा मृत्यू झाला याची अधिकृत माहिती नसली तरी समाजवादी पक्षाकडून 16 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. योग्य ती चौकशी करून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रूपये देण्यात येतील असं  उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केलं आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...