Monday 21 August 2017

छत्तीसगडमध्ये ऑक्सिजन कांड, ३ मुलांचा गेला बळी


 रायपूर,21-ऑक्सिजन पुरवठ्या अभावी उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये ६० मुले दगावल्याची घटनेची अद्याप शाई ओली असताना छत्तीसगडमध्येही अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. छत्तीसगडमधील डॉ. भीमराव आंबेडकर रूग्णालयात ऑक्सिजन न मिळाल्याने तीन मुलांचा बळी गेला असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांनी दिले आहेत.
रविवारी ही घटना घडल्याचा स्थानिक माध्यमांनी दावा केला आहे. ऑक्सिजन पुरवठा विभागात कार्यरत असलेला ऑपरेटर कर्तव्यावर असताना दारू पित होता. दारू प्यायल्यानंतर तो झोपी गेला. त्यामुळे या मुलांना ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही. परिणामी, तिन्ही मुलं दगावली, असा दावा माध्यमांनी केला आहे. याप्रकरणाची रमण सिंह यांनी गंभीर दखल घेतली असून तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणात लक्ष घातल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी ऑपरेटरला ताब्यात घेतलं आहे. मात्र, या मुलांचा मृत्यू ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्यानं झाला नसल्याचं आरोग्य संचालक आर. प्रसन्ना यांनी स्पष्ट केलं.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...