Tuesday 15 August 2017

‘न्यू इंडिया’त गरिबीला थारा नाही


 नवी दिल्ली,14-स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला उजाळा देत २०२२ पर्यंत साध्य करावयाच्या ‘न्यू इंडिया’मध्ये गरिबीला थारा नसेल, असा निर्धार स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधून केलेल्या पहिल्याच भाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी देशवासियांपुढे व्यक्त केला.
राष्ट्रपती कोविंद यांनी महात्मा गांधी, पंडित नेहरु, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या सर्व महापुरुषांचा गौरवपूर्वक उल्लेख केला. कोविंद यांनी ‘न्यू इंडिया’चा दहा वेळा उल्लेख केला. ‘आम्ही जेथे उभे आहोत तिथून पुढे गेलो तरच सर्वांना अभिमान वाटेल. आपल्या क्षमतांचा पूर्णपणे विकास आणि उपयोग करण्यास सक्षम ठरुन राष्ट्रकार्यात योगदान देता येईल अशा ‘न्यू इंडिया’ची आम्ही निर्मिती करु शकू,’ असे राष्ट्रपती म्हणाले. २०२२ साली देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करेल, तोपर्यंत मागणीनुसार वीज, चांगले रस्ते, आधुनिक रेल्वेचे जाळे, मानवी मूल्यांसह वेगवान आणि निरंतर विकासाकडे वाटचाल करणाऱ्या, लिंग आणि धर्माचा भेदभाव नसलेल्या, देशाच्या विकासात सहभागी असलेल्या सर्व समाजाचे, ‘न्यू इंडिया’चे चित्र त्यांनी रंगविले. ‘न्यू इंडिया’मध्ये गरिबीला वाव नसून देशवासियांना सशक्त बनविण्यासाठी आणि एकाच पिढीत गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जास्तीत जास्त वापर करण्याचे त्यांनी आवाहन केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...