Wednesday 23 August 2017

कर्जमाफी ऑनलाईन नोंदणीसाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदत

मुंबई, दि. 23 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची मुदत दिनांक 15 सप्टेंबर 2017 पर्यंत राहील. आणि दिनांक 1 ऑक्टोबर 2017 पासून कर्ज माफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. तसेच दि. 22 ऑगस्ट 2017 पर्यत 22 लाख 40 हजार 943 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.तर 18 लाख 85 हजार 457 शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. असा निर्णय आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या झालेल्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक त्यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस.संधू, कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कर्जमाफी अंमलबजावणी संदर्भात येत असलेल्या अडीअडचणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ई-सुविधा केंद्रांवरील अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीही काही केंद्रांवर शेतकऱ्यांकडून अर्ज भरण्यासाठी पैसे आकारण्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत संबधित ई-सेवा केंद्रांवर कारवाई करावी आणि बंद असलेली केंद्र तात्काळ सुरु करावेत, असे आदेश या बैठकीत देण्यात आले. राज्यातील सर्व संबधित शेतकऱ्यांनी दि. 15 सप्टेंबर 2017 पर्यंत जवळच्या ई -सुविधा केंदांवर जाऊन कर्जमाफीचे अर्ज भरावेत.असे आवाहन सहकार मंत्री श्री देशमुख यांनी यावेळी केले.
· बंद असलेली ई-सुविधा केंद्र तत्काळ सुरु करण्याच्या सूचना.
· कर्जमाफीसाठी वेळेत अर्ज भरण्याचे शेतकऱ्यांना आवाहन.
· आतापर्यंत 22 लाख 40 हजार 934 शेतकऱ्यांची नोंदणी
· तर 18 लाख 85 हजार 457 शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...