रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर, संस्थेचे अध्यक्ष अरुण लखानी, केशव मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रीती झिंटा हिची विशेष उपस्थिती होती.
एकल विद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणासोबतच विकासाची कामेदेखील होत आहेत. येथील शिक्षकांच्या प्रयत्नातून ४५ गावे प्लास्टिकमुक्त झाली आहेत. आदिवासी युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिभा असते. त्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा दाखविण्याची आवश्यकता असते. गडचिरोली जिल्ह्यात पाच वर्षांत पाच हजार कोटींचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. याशिवाय ‘आयटीसी’ या कंपनीने १० हजार आदिवासींना रोजगार मिळेल असा प्रकल्प सुरू करण्याची तयारी केली आहे.
आदिवासी क्षेत्रात शिक्षणासोबतच रोजगारनिर्मिती तितकीच महत्त्वाची आहे, असे गडकरी म्हणाले. सर्वच्या सर्व एकल विद्यालय आता डिजिटल होणार असल्याची माहिती यावेळी गडकरी यांनी दिली. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, संस्थेचे सचिव प्रा.राजीव हडप, ट्रस्टी मोहन वºहाडपांडे, अरविंद शहापूरकर, वीरेंद्र अंजनकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. अरुण लखानी यांनी प्रास्ताविक केले तर गजानन सिदाम यांनी एकल विद्यालयाबाबत माहिती दिली. प्रशांत बोपर्डीकर यांनी संचालन केले तर मोहन वºहाडपांडे यांनी आभार मानले. सीमा गायधने यांनी वैयक्तिक गीत सादर केले. प्रशिक्षण वर्गातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिवदास भारसागळे, उषा ब्राम्हणकर, राजू जांभुळकर, गणेश चाफले, राजेश मडावी, राजेश उईके, दुर्योधन फुरसुंगे यांचा सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment