Monday 28 August 2017

आर्किटेक्टरच्या विद्यार्थ्यांनी शहराच्या सौदंर्यिकरणात घातली भर

20952991_1611212612245840_2315012574353892980_n

गोंदिया(berartimes.com),दि.27- शहराच्या सौंदर्यिकरणात येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्किटेक्चर शाखेच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी व विद्याथ्र्यांनी घातलेली भर ही नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागालाच नव्हे तर जिल्हा प्रशासनालाही लाजवणारी ठरली आहे.विशेष म्हणजे राष्ट्रीय स्तरावर आर्किटेक्चर विभागाच्यावतीने नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुटंडस ऑफ आर्किटेक्चर च्यावतीने राष्ट्रीयपातळीवर डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानुसार येथील एमआयटीच्या आर्किटेक्चरच्या ३०-४० विद्याथ्र्यांनी ५ गटाच्या माध्यमातून शहरातील पाच ते सहा चांगल्या स्थळांची निवड केली.त्यानंतर निवड केलेल्या स्थळाच्या सौंदर्यिकरणाची योजना आखली व नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अशोक इंगळे यांची भेट घेऊन त्यांना आपली संकल्पना समजावली.त्या संकल्पनेला दाद देत नगराध्यक्ष इंगळे यांच्यासह नपचे बांधकाम सभापती घनश्याम पानतावणे, नगरसेवक शकील मंसुरी यांनी त्यांना पूर्ण सहकार्याचे आश्वासन देत नगरपरिषदेकडून या सौंदर्यिकरणासाठी मंजुरी दिली. विद्याथ्र्यांच्या पाचही गु्रपचे नेतृत्व अनुज जायस्वाल या विद्याथ्र्याने केले.
त्यानुसार पहिल्या ग्रुपमध्ये असलेल्या श्याम qबदल,पंखुरी अग्रवाल,अर्पिता चॅटर्जी,शारुन होतचदांनी,साची टेंभरे,अंजली गुप्ता,चेतना नंदनवार या विद्याथ्र्यांनी राजीव गांधी स्मारकाचे सौंदर्यीकरण केले आहे.ग्रुप २ मधील हंसा अजय अग्रवाल,रोहित गिर्हे,निधी जैन,रुतिका अग्रवाल,हर्षा गगवांनी,शिवानी पंडित,संजय मोहबे यांनी स्टेडीयम समोरील फुटपाथचे केलेले सौंदर्यिकरण हे अप्रतिम ठरले आहे.सोबतच ग्रुप ३ मधील गौरव समरीत,रुषिका जैन,कोमल रावलानी,qकजन चव्हाण,सरोज मेंढे,साक्षी बैस,निकिता रामटेके व निकिता लालवानी यांनी जमनालाल बजाज प्रतिमेचे सौदंर्यिकरण तसेच क्रॉसरोड चे काम केले आहे.चौथ्या ग्रुपमधील शुभम बनोटे,अमन चौरासिया,अनु श्रीवास्तव,विधी चव्हाण,ईशा वैद्य,जान्हवी रिचारिया,पूजा सोनवणे व श्वेता हिरापूरे यांनी मोक्षधामचे सौंदर्यिकरण केले आहे.तर पाचव्या ग्रुपमधील आयुषी दादरीवाल,श्रिया चंदेल,जुही पर्यानी,शैलजा मुरकुटे,यामिनी पटले,शिवानी पटले,अर्पिता अग्रवाल व साक्षी फाये यांनी सर्वाधिक वर्दळीचा चौक असलेल्या नेहरू चौकातील प्रतिमेचे व उड्डाण पुलाच्या खाली केलेले सौंदर्यिकरण हे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.20914210_1611212632245838_8368192041535534736_n
विशेष म्हणजे या विद्याथ्र्यांनी या सर्व कामासाठी प्रशासनासह नागरिकांचीतर मदत घेतलीच आहे.सोबतच स्पॉनसरशिपच्या व स्वतःच्या निधीतून हे कार्य केले आहे.या अभियानात सहभागी असलेली हंसा अजय अग्रवाल या विद्यार्थिनीने सांगितले की आम्ही पाच ग्रुपच्या माध्यमातून शहरातील पाच ते सहा मुख्यस्थळांची निवड केली आणि त्या स्थळांचे सौंदर्यिकरण करून ये जा करणाèयांना आपल्या शहराचा एक नवा रूप बघावयास मिळायला हवे ही संकल्पना मनात ठेवली.सोबतच राष्ट्रीय स्तरावर जर आम्हाला आमचे डिझाईन लोकांपर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून पोचवून शहराचे सुद्धा नाव देशपातळीवर दखल पात्र ठरावे या हेतूनेच आम्ही वेगवेगळ्या संकल्पना साकारत या स्पर्धेत सहभागी झाल्याचे सांगितले.विशेष म्हणजे या सौंदर्यिकरणानंतर नागरिकांच्या मनात एक चांगली प्रतिमा शहराची तयार होऊ लागल्याचे चित्र असून ज्याठिकाणी घाण व अस्ताव्यस्त परिसर असायचा आज तोच परिसर स्वच्छ व सुंदर कसा राहील विद्याथ्र्यांनी केलेले सौंदर्यिकरण टिकून कसे राहील यासाठी धडपडताना दिसून येतात हा या विद्याथ्र्यांच्या कलात्मकतेचा विजयच म्हणावा लागेल असे वाटते.विशेष म्हणजे नासा नॅशनल डि नगरपरिषदेने पूर्ण सहकार्य बहोत खर्चा स्पान्सरशिप सह अंदाजे ५-६ लाख रुपये जवळपास खर्च या कामासाठी आलेला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...