Sunday, 13 August 2017

पोलिसांचा पैसा केंद्राला परत


 मुंबई,दि.13- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राने दिलेला निधी राज्य सरकारला खर्च करता आला नाही. परिणामी, हा निधी पुन्हा केंद्राकडे परत गेला, अशी माहिती कॅगच्या अहवालात आहे. डिजिटल इंडिया, पोलिस दलाचे आधुनिकीकरण, पोलिसांच्या घरांचे बांधकाम, वाहने, शस्त्रपुरवठा यासाठी हा निधी खर्च करता आला असता, असेही निरीक्षण कॅगने नोंदवले आहे.

भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांचा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला. कॅगने पोलिस दलाबाबत काही शेरे मारले असून पोलिस दलाची कार्यक्षमता वाढविली पाहिजे, वाहनांची संख्या वाढवावी तसेच वाहनचालकांची भरती करावी, अशी कॅगने शिफारस केली आहे. मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर राज्य सरकारने पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाची योजना हाती घेतली. त्यासाठी केंद्र सरकारकडून गेल्या पाच वर्षांत राज्याला ४१९ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मिळाला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...