Friday, 4 August 2017

विद्यार्थ्यांच्या ढकलगाडीला केंद्राचा ब्रेक


  नवी दिल्ली,दि.4(वृत्तसंस्था)- पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याच्या धोरणाला केंद्र सरकारने मूठमाती दिली आहे. यापुढे पाचवी व आठवी इयत्तेतील विद्यार्थी वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झाले नसतील तर त्यांना पुन्हा त्याच वर्गात बसावे लागेल. अर्थात, या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाईल व त्यात ते उत्तीर्ण झाल्यास त्यांना पुढील इयत्तेत प्रवेश मिळेल.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयाला संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर तो देशभरात लागू होईल. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सध्या नववीपर्यंत पुढे ढकलण्यात येते. या प्रकारामुळे शिक्षणाचा दर्जा घसरत असल्याची टीका होत होती. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत सक्तीचे शालेय शिक्षण व विनामूल्य शिक्षणासंबंधीच्या तरतुदीही मंजूर करण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...