Friday, 4 August 2017

युद्धाने नाही तर चर्चेनेच डोकलामवर तोडगा काढू- स्वराज


 नवी दिल्ली,दि.03-डोकलाम वादावर आज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट शब्दांत सरकारची भूमिका मांडली. कोणत्याही समस्येवर युद्ध हा पर्याय असू शकत नाही म्हणूनच आम्ही चर्चेच्या मार्गानेच 'डोकलाम'वर तोडगा काढण्यासाठी आग्रही आहोत. द्विपक्षीय चर्चेतून हा प्रश्न सुटेल. संयम आणि धैर्याने आम्ही या समस्येला सामोरे जात आहोत, असे सुषमा म्हणाल्या.

परराष्ट्र धोरणावर आज राज्यसभेत वादळी चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना सुषमा यांनी एकेक मुद्द्यावर स्पष्टीकरण देत विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या राजदूतांची भेट घेतल्याने मोठं वादळ उठलं होतं. त्याकडे बोट दाखवत सुषमा यांनी विरोधी पक्षावर हल्ला चढवला.

विरोधी पक्षाचे नेते चीनच्या राजदूतांना का भेटले? विरोधी पक्षाने आधी भारताची बाजू ऐकून घ्यायला हवी होती. आम्ही डोकलाम वादाची माहिती सगळ्यांनाच दिली होती, असे सुषमा म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...