परराष्ट्र धोरणावर आज राज्यसभेत वादळी चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना सुषमा यांनी एकेक मुद्द्यावर स्पष्टीकरण देत विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या राजदूतांची भेट घेतल्याने मोठं वादळ उठलं होतं. त्याकडे बोट दाखवत सुषमा यांनी विरोधी पक्षावर हल्ला चढवला.
विरोधी पक्षाचे नेते चीनच्या राजदूतांना का भेटले? विरोधी पक्षाने आधी भारताची बाजू ऐकून घ्यायला हवी होती. आम्ही डोकलाम वादाची माहिती सगळ्यांनाच दिली होती, असे सुषमा म्हणाल्या.
No comments:
Post a Comment